Wednesday, July 12, 2017

कथा - भक्ती

भक्ती 





सालाबाद प्रमाणे यंदाही पंढपूरचा  वारी सोहळा सुरु झाला.. अनेक पाऊलांचे  ठसे त्याच मार्गावर पुन्हा उमटू लागले.. वयाचे बंधन नाही किंवा भिन्नतेचे चिन्ह नाही.. पाऊले ज्ञानबा तुकारामाच्या गजरात आपली वाट सरत होते.. अनेक गाव, जिल्हा ह्या वारीतील पालख्यांची.. त्यातील वारकऱ्यांची आतुरतेने वाट बघत असत.. यंदा आषाढी महिन्या प्रमाणे रमजान चा महिना चालू होता.. गावात पालखी आली.. त्याचे नियोजन सागवती सर्व मुस्लीम बांधवानी केले.. संध्याकाळचा रोजा आपण वारकऱ्यांसोबत पिठलं-भारीने सोडायचं.. खरंतर अखंड विश्वात हिंदू आणि मुस्लिम हे कट्टर पण एका वारीच्या सोहळ्याला एवढा एकोपा म्हणजे शत्रुत्व म्हणून हिणविणाऱ्यांच्या तोंडावर एक चपराक म्हणावी लागेल.. तुकारामांचे वारीवरील काही ओळी आठवल्या "वर्ण अभिमान विसरता याती, एक ऐका लोटांगणी जाती "  खरंच एका वारीचा एवढा अनुभव त्या संतांनी देखील घेतला असावा म्हणून एकोपायची गणित आपल्या अभंगात आपल्या आचरणात त्यांनी आणली असावी.. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यत एक अवलिया राहतो.. संध्याकाळी पायाला घुंगरू बांधून.. विना - चिपळ्यांनी गवळण गातो.. संतांच्या अमूल्य प्रत्येक अभंग कीर्तनाच्या माध्यमातून मांडतो... ह्या अवलियाच नाव राजू बाबा शेख... शेख हे नावच जातीयतेला तडा देणारचं... लहानपणा पासूनच मंदिराच्या पायऱ्यांवर बसून कीर्तनाची त्यांची आवड निर्माण झाली.. धर्म मुस्लिम आहे आणि हा मंदिराच्या पायऱ्यांवर कसा ? असे जातीय आणि धर्म वाद्यांनी गावात प्रश्न उभे केले.. स्वतः राजू बाबा शेख ह्यांच्या घरातून देखील ह्या गोष्टीला विरोध झाला.. आपण मानव निर्मित धर्माचे जातीचे पशु आहोत पण ह्या विश्वाचा करता करविता एकच आहे असा त्यांचं मत तयार झाला... खरंच आहे म्हणा कारण ज्या संत एकनाथ महाराजाच्या असंख्य गौळणी राजू बाबा शेख ह्यांच्या मुखी नाचत असत त्याच संत एकनाथांच्या फकिरा ह्या सोंगी भारूडाचे ओळ ह्याच कशाची सख्त देणाऱ्या होत्या.. "हजरत मौला, हजरत मौला.. एका जनार्दनीं निशब्ध अल्ला, अस्सल वो ही विटपर अल्ला " संत एकनाथांच्या ह्या शिकवणीचा एवढा परिणाम म्हणजे संतांच्या शुद्ध विचारांचे एक सांगड राजू बाबांच्या चारित्र्यात दिसली.. भक्ती निव्वळ कोणत्याही धर्माच्या गाथेचं प्रभुत्व नाही ती मनाच्या शक्ती उगम स्थान आहे.. तिला कोणत्याची पद्धतीने करा मणी फक्त निखळ भावना असु द्या..

 
- शशांक बामनोलकर

Thursday, June 29, 2017

अशी पावसाची सर - कविता


अशी पावसाची सर - कविता 

पावसाची लहर, वाऱ्याची कहर 
विजेच्या गोंगाटात , अशी पावसाची सर 

थेंब थेंब पावसाचा, ओला केला कण मातीचा 
सुखाड वसुंधरेवर, अशी पावसाची सर 

पाला पाचोळ्याचे रान, भेगा ओसाड हे वन 
क्षण पालटून बरसे, अशी पावसाची सर 

कोरड्या घशाला ना गिळे सुक्के दाणे,
रुतले पायी काटे अनावणे 
हिरवा पसरवले शाल, अशी पावसाची सर  

संसार त्यांचा खोपटाला बांधून 
भेसडलं आग त्यास 
आग विजवेना चोचीतले बुंद
दाटल्या आभाळी बहरली ,अशी पावसाची सर 


- शशांक बामनोलकर

Wednesday, June 28, 2017

* वारी * - कथा




- वारी - 

सकाळचे जवळपास ९ वाजले.. जॉबला जाण्याची धावपळ होती..adhalyach दिवशी आई वडिलांसोबत बराच वाद झाला होता..  टीव्ही चालूच होता..  त्यावर बातम्या चालू राहत होत्या.. काल पासून ते आता पर्यंत सर्व माहिती त्या छोट्या खोपट्यात मिळत होती.. माझं लक्ष दुर्लक्षित होत पूर्णपणे.. अचानक "विठ्ठल विठ्ठल , ज्ञानोबा माउली .. ज्ञानराज माउली तुकाराम " असा  गजर कानावर गोंगावात होता.. नकळत लक्ष तिथे खेचलं गेलं.. त्यात चित्रित होणार पालखी सोहळ्यात माझं मन रमत राहील.. तो जय घोष.. मृदूंग टाळ ह्यांची साथ.. वारकऱ्यांच्या मुखातून एक सूर.. वा।।.. मजा आली.. खरंच माणूस हा इतका एकत्र येऊ शकतो का ? असा प्रश्न पडला.. २८ युगे हा विठ्ठल ह्या पंढरपुरात स्थानापन्न झाला म्हणतात.. तेव्हा पासून आज पर्यंत खरंच हा प्रवास असाच टिकला आहे का ?.. "नाही भेदाभेद, संगी अंगी विठ्ठलाची साथ" भर पाऊस उन्हाळ तरीही हा मोह का ? कोण हा विठ्ठल ?.. का ह्याच्या भेटला मैलो मैल हि लोक पायी चालतात?.. अनेक ना अनेक प्रश्न मनाला पोखरू लागले.. भेडसावणाऱ्या प्रश्नांना उत्तर अपेक्षित मिळालेलं नाही.. समोर टीव्ही मधल्या त्या बातम्या संपल्या.. लक्ष घडाळ्याकडे गेलं तसाच उठून मी ऑफिसकडे धावत सुटलो.. उशीर झाला.. बॉस खूप भडकला होता.. मला कॅबिन मध्ये बोलावलं मी गेलो.. चिडलेल्या स्वभावातला बॉस सुरु झाला..
मी :- मे आय कॉमिन्ग सर..
बॉस : - या...
मी :- सर तुम्ही बोलावलं का ?
बॉस : - काय ? उशीर का ?
मी : - काही नाही ..
बॉस:- काही नाही म्हणजे ?.. आज मिटिंग होती तुमच्या मुले कॅन्सल झाली..
मी :-  माझ्यामुळे का ?
बॉस :- आजच्या मिटिंगच्या फाईलच तुमच्याकडे होत..
मी :- सो सॉरी सर .. मी विसरलो ...
बॉस:-  वा ।। छान.. आज तुम्ही सगळी कडून कंपनीचं नुकसान करणार आहेत का ? (निरुत्तर) जा आणि फाईल आणा..
मी :- ओक सर..
केबिनच्या बाहेर गप मान खाली टाकून, मी निघालो.. आपण स्वतंत्र का राहू शकत नाही ह्याचं आचार्य वाटलं.. कारण अर्थ साठी स्वार्थाची साथ आपल्याला जोडावी लागते हेच आपलं जगणं झालाय.. ऑफिसाच्या बाहेर पडलो.. टेन्शनच्या भरात थेट टपरी गाठली.. सिगरेटच्या धुरात स्वतःच्या आयुष्याचे स्वप्न ढगात रंगवत होतो.. खचलेल्या भुकेला, चहावर भागवत होतो बिंधासपणे... काही वेळ गेला. चिपळ्यांचा आवाज कानावर पडला.. पहिल्यांदा भास वाटला.. चहूकडे पाहिलं.. कोणी दिसलंच नाही.. पुन्हा वाजला.. नकळत उत्सुकता वाढली.. माझ्या पाठीला एक स्पर्श झाला..  एक आवाज आला.. "पोरा, भूक लागली हाय, काय देशील का खायला ?.." वळून पाहिलं..एक ८० वर्षाचं वृद्ध होते.. सोबत तंबोरा आणि चिपळ्या.. भुकेने आणि वयाच्या आवाज खूपच खालावलेला होता.. करुणेचा चेहरा उपाशी पोटाची साक्ष देत होता.. वयाच्या निष्क्रियतेचा अंग थरथरत होतं.. काही क्षण टक लावून पाहताच होतो.. डोळ्यांच्या सुखाड भेगा माझ्या डोळ्यांना पावत होते.. मी म्हटलं "बाबा, या इथे बसा.. काय खाणार तुम्ही ? " व्याकुळ भुकेचा चेहरा डोलला.. "काहीही दे.. पोटाला जरा आधार मिळेल असं" समोर उभ्या असलेल्या खवलीतून एक जेवणाचं ताट घेतलं.. ते त्या वयस्करकडे सोपवलं.. भरलेलं ताट हे पहिल्यांदाच पाहतोय असं एकंदरीत चेहऱ्यावर  उमटलं... थरथरलेले हाथ ताटात गेले, मुठीत घेतलेलं जेवण मुखाशी जाऊ लागले..   बघता बघता , जेवण संपले भरलेलं जेवण कण मात्र राहील नाही.. डोळे पाणावले.. बहुधा त्यांच्यात दडलेल्या भुकेला पाणी मी कुठे पाजलं  असावं त्याचा तो आनंद.. बराच अबोलक प्रसंग राहिलेल्यवर त्यांनी मलाच विचारलं "काय करतोस पोरा ?" मी म्हणालो "इथे ऑफिस आहे माझं"
वयस्कर - छान.
न राहता मला भेसळलेला प्रश्न विचारला
"बाबा , तुम्ही वारकरी वाटतात"
वयस्कर - हो
मी - मग तुम्ही इथे काय करतायत ?  वारीला गेलात नाही का ?
वयस्कर - पोरा, वाऱ्या मी बऱ्याच केल्या, घरात पोर बाळ व्हती .. संसार व्हता तिथं पर्यंत ठीक हाय.. आता न्हाय झेपत..
मी - आता कोण कोण असत ?
वयस्कर - कुणीच न्हाय
छान एक स्मित हास्य होत.. एवढा असून एक माणूस एवढा आनंदी कसा ? प्रश्नच होता..
मी - बाबा. घरदार नसताना कस होत जमत हे सगळं ?..
वयस्कर - जमवावं लागत , अंगाशी बळ साठवण लागत..
मी - मग तुम्ही वारी का बंद केली ?
वयस्कर - वारी म्हणजी नुसतं पायी चालून पांडुरंग पाहावा.. अशी न्हाय.. तळीं होणं हाय.. आपल्या अवती भवती, प्रत्येक जण हा आपल्यासारखाच असतु.. ह्याची जाण वारी मिळते बघ..
मी - मला वारीला जायचं आहे.. आज टीव्हीत पाहिलं तिथलं वाटेवर छान दिसत.. बघायचंय मला
वयस्कर - छान दिसतंय म्हणून बघायला जाऊ नकोस पोरा.. छान वाटलं तरच जा तिथे..
मी - हो बरोबर आहे तुमचं
वयस्कर - तुझ्या घरी आई बाप नाही काय रे?
मी - आहेत
वयस्कर - मग त्यांचं २-३ प्रदक्षिणा मार
मी - का ?
वयस्कर - आम्हा आई बाप त्यो विठ्ठल - रख्माई.. तुमचे हाय कि  आय बाप  त्यांचीच सेवा करा कि.. कशाला त्यासाठी वारी करताय..

हेच शब्द जरा बोचले मला.. काळ रात्री आई - वडिलांशी भांडण मला पण अस्वस्थ करत होत.. लक्ष त्याच भांडणांकडे वळलं होत, म्हणून मी देखील स्वतःच्या विश्वात पोरकं झालो होतो.. झालेला मनस्ताप आणि चढलेला आवाज.. त्रास किळस आणि बराच तंटा कानात घोरायला सुरु झाला.. डोळ्यात आसवांनी जागा घेतली..
तितक्यात त्या वयस्करने विचारलं "पोरा, काय झालं ? शांत का ? "
"काही नाही बाबा, पांढुरंगाच्या वारीला आठवता.. माझे कर्म चंद्रभागेत धुवत होतो"
आपली श्रद्धा, आपुली आणि बऱ्याच कल्पनेचे दोरे आपण बाहेरच्या जगात शोधात असतो.. विश्वाचा एक धागा घरच्या चौकटीत शोधणं आपण विसरतो...

- शशांक बामनोलकर

Tuesday, June 27, 2017

- होडी - *कथा*

- होडी -




रोजच्या धाव पळीच्या जीवनात आपण स्वतःच्या अस्तित्वाला कुठेना कुठे संशोधात असतो... आपण स्वतःला हुनारकडे दुर्लक्ष करतो.. मागच्या आठवणी सहज खोडून आपण पुढच्या ओव्या इतक्या निरर्थक लिहतो कि, त्याचा मागच्या व आजच्या घटनेचा काहीच संबंध लागत नाही...  पावसाचे दिवस होते..  प्रथे प्रमाणे मुंबई सारख्या शहराला पुराचं अस्तिस्त्व रेंगाळत होत.. नेहमी प्रमाणे यंदा जरा उशीर झाला घरी यायला.. घरात अंधार होता. आधी वाटलं लाईट गेली असावी.. जवळपास १० -१०.३० झाले होते.. घराचा दरवाजा अलगद उघडला.. बायको पोरांना मांडीवर झोपवत होती.. मुलं वाट बघून जेवून शांत झोपले.. बायको मात्र वाट पाहत होती.. बाहेर मुसळधार पावसाचं आवाज नको.. म्हणून तिने दार बंद केले.. आणि मुलांना झोप लागत नव्हती म्ह्णून लाईट बंद केली होती.. चिंब भिजले कपडे बदलून मी जेवणासाठी बसलो.. भर पावसात गरम गरम जेवण बायकोनी वाढलं.. तीही  होती सोबत.. दोन दोन घास एकमेकांना भरवत जुन्या आठवणी ताज्या रंगवत होतो.. जेवण संपलं आणि आम्ही दोघं झोपण्याच्या तयारीत होतो.. मी खिडकीत पाहिलं मंद प्रकाशानं मन वेधलं.. काही सावल्या तिथे गोंगाट घालत होत्या.. तेच पाहायला खिडकी जवळ बसलो.. समोरच्या फूट पाथवर एक दारिद्र्य लाभलेलं ओसाड झोपडं होत.. तिथे लहान लहान किमान ४-५ वर्षाची पोरं पावसात भिजत होती.. घरात कधी जेवण मिळेल किंवा नसेलही.. तरी चेहऱ्यावर एक सर्वसंपन्न श्रीमंतीलाही भिकारी समजेल असा होता.. ती ४-५ वर्षाची ३-४ पोरं आणि त्यांचे आई-बाप.. पावसाचा असा आनंद घेत होते जणू तो पहिल्यांदाच पडला असावा.. त्या लहान सहानं पोरांना त्यांच्या आई बापांचं असा सहवास पाहता माझी नजर माझ्या घराच्या भिंतीवर वळली..
भिंतीवर टांगलेल्या चौकटीतल्या प्रतिमा पाहताच डोळे टचकन भरले.. जणू पावसाचे थेंब माझ्या डोळ्यांनी उधार घेतले असावे.. ते कुटुंब पाहता मला माझ्या आई वडिलांची आठवण भेडसावायला लागली... असाच लहान असताना.. जवळ पास ५-६ वर्षाचा.. एकदा शाळेतून घरी आलो.. भर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत आजूबाजूची पोर.. ह्या मेघ मल्हाराचा स्वर्ग सहवास खेळत होते.. ओले चिंब शाळेचे कपडे.. पाण्यात पडणे - धावणे - पावसाच्या पाण्याने घराच्या छपऱ्याखाली भिजणे.. स्वतः भिजणं आणि दुसऱ्याला भिजविणे.. हा आनंद खूप भेडसावत होता.. त्यात समोर आजूबाजूच्या पोरांनी कागदाच्या होड्या पाण्यात सोडू लागले.. हे पाहत माझा हट्ट शिगेला गेला.. आई बाबांसमोर "मलाही अशा होड्या बनविण्याचा हट्ट केला".. कसा बसे घरात असलेले कागद आईने जमा केले.. कागदाच्या घड्या घालायला आईनी तर घडी उघडायची कशी ती बाबानी शिकवली.. आणि त्यांनी तयार केलेली..हि होडी मी पाण्यात सोडली.. आयुष्याची ३५ वर्षे उमटून गेली तेव्हा कळलं ह्या घड्या.. संस्कारांच्या घड्या तुमच्या मातृत्व -पितृत्व देऊनच जात फक्त संकटाच्या अशा पावसात तिचा कसा उपयोग करता आला पाहिजे.. त्या कागदी होड्या आजही पहिला तरी आई बाबा त्यात दिसतात.. होडीचा पुढचं तो म्हणजे बाबा आणि मागचं टोक म्हणजे आई.. आणि मध्ये गर्वाने उंच मानेचं टोक म्हणजे मी.. जीवनाचं प्रवाह असाचना..  आठवणी चा अर्थ निवळ एका पावसाने आणला.. कोरड्या आठवणींना तोही ओला करून गेला..

- शशांक बामनोलकर
        

Monday, June 26, 2017

शेवटी कावळा मेला....

शेवटी कावळा मेला.... नव्या जन्माचं कवच चोचीनं फोडलं श्वासच घोट पाहिल्याचं चाखलं उघडले डोळे घरातल्या कुणी दिसेना विश्वाचं चित्र उघड्या डोळ्यांनी पाहवेना... नुसता किलबिलाट झालं सोबतच्या पिल्लांचा दुरून आली एक कावळी , तिच्या चोचीत काहीतरी मावेना किलबिलत्या पिल्लं खाऊ देऊ लागली पाणावलेल्या डोळ्यात ती माझ्या कडे पाहू लागली घास संपला चोचीतल्या कुंपणाचा नव्यासाठी पुन्हा ती उडून गेली... दिवस असेच सरले होते, कोवळ्या शरीरावर नवे पिसांचे झालर चढले होते.. पंखात बळ साठवून स्वप्न धैय गाठायचे उडण्याआधी भीती समाज कावळ्यांचे.... एकवटले मन घेतली एक झेप कोसळले शरीर जमिनीवर थेट सावरले स्वतःला उघडले डोळे पाहुनी परिसर मी चक्क झाले.. आला एक माणूस मला पाहून उचलले मला करुणा करून घोळका क्षणात जमला माझ्या अवती भवती स्पर्श झाला मानवाचा ती जात त्यांना पापी होती... झाली घोळक्यांची पंचायत किलबिलाट कर्कश सुरु झाला. पडलेल्या माझ्या देहाला चोचीचा मारा झाला... प्रत्येकानी किमान एक एक मारा केला शेवटी कावळा मेला... - शशांक बामनोलकर